महाराष्ट्रात २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार; नवीन जिल्ह्यांची यादी

महाराष्ट्रात २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार; नवीन जिल्ह्यांची यादी: सध्या, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक नवीन प्रस्थापित जिल्हे आहेत, जे सरकारचे व्यवस्थापन आणि प्रत्येक गावात प्रशासकीय सेवा प्रदान करण्यात तसेच जिल्ह्याच्या संपूर्ण विकासात मदत करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत करतात. भारत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा 26 जिल्हे निर्माण करण्यात आले आणि कालांतराने आणखी काही जिल्हे जोडण्यात आले. याव्यतिरिक्त, वीस वर्षांच्या कालावधीनंतर महाराष्ट्रात दहा नवीन जिल्ह्यांची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या 36 झाली. आणि यासारख्या 358 तालुक्यांमध्ये महाराष्ट्र दिसत आहे; तरीही, हे बदलणार आहे.maharashtra districts list

 

गेल्या अनेक वर्षात जिल्ह्यांचे विभाजन झालेले नाही, लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी सातत्याने होत असते. यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. राज्याची स्थापना झाली त्यावेळी २६ जिल्हे होते, मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढली तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अवघड झाले होते, त्यामुळे टप्प्या टप्प्याने १० नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते.

 

राज्यात आजच्या घडीला असे अनेक जिल्हे आहेत जे अनेक किलोमिटर पसरलेले आहेत, विशेष करून ग्रामीण भागात जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे म्हटले की, ये-जा करण्यात पूर्ण दिवस घालवावा लागतो, म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय प्रशासकीय यंत्रणेलाही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. त्यामुळे नवीन जिल्हे निर्माण होणे आवश्यक असून, सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Maharashtra districts list

 

एक मे 1960 महाराष्ट्राच्या स्थापने वेळी असतात असलेले 26 जिल्हे – रायगड, ठाणे, रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, जळगाव, यवतमाळ

 

 

आजचे प्रस्तावित 22 जिल्हे

 

नाशिक जिल्ह्यातून नवीन मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहेत.
अहमदनगरचे विभाजन करून नवीन संगमनेर शिर्डी आणि श्रीरामपूर असे नवीन तीन जिल्हे निर्माण होणार आहेत.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन जिल्हे निर्माण होणार आहेत.
पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन शिवनेरी हा जिल्हा तयार होणार आहे.
रायगड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन महाड जिल्हा तयार होणार आहे.
सातारा जिल्ह्यातून नवीन माणदेश हा जिल्हा तयार होणार आहे.रत्नागिरी मधून नवीन मानगड जिल्हा तयार होणार आहे.
बीड जिल्ह्यामधून आंबेजोगाई हा जिल्हा नवीन तयार होणार आहे.
लातूर जिल्ह्यातून नवीन उदगीर जिल्हा निर्माण होणार आहे.
नांदेड या जिल्ह्यातून नवीन किनवट हा जिल्हा तयार होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातून नवीन भुसावळ हा जिल्हा तयार होणार आहे.
बुलढाणा या जिल्ह्यातील नवीन खामगाव हा जिल्हा तयार होणार आहे.
अमरावती या जिल्ह्यातून नवीन अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
यवतमाळ या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन साकोली हा जिल्हा तयार होणार आहे.
चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन चिमूर हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून नवीन अहेरी हा जिल्हा तयार होणार आहे.

Leave a Comment