maharashtra New Districts List : महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची होणार निर्मिती, नवीन जिल्ह्यांची यादी पहा

Maharashtra New Districts List : महाराष्ट्र निर्मितीच्या इतिहासात जर पाहायला गेलं तर गुजरात आणि महाराष्ट्र एकेकाळी हे दोन राज्य एक होती कालांतराने भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषेचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आले तसेच गुजरात हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आले.गुजरातने मुंबई घेण्यासाठी भरपूर आटापिटा केला परंतु मुंबई त्याला मिळाली नाही आणि महाराष्ट्र 01 मे 1960 रोजी अस्तित्वात आला, महाराष्ट्र जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा अनेक जिल्हे लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने प्रशासकीय कामासाठी नागरिकांना जाण्या-येण्याचे अडचण होत होती पूर्ण दिवस दिवस तिथे जाण्यासाठी लागत होता.

 

 

मोठ्या जिल्ह्यामधून नवीन जिल्हे निर्मिती करण्याची प्रक्रिया झाली त्यासाठी जवळपास 20 वर्षाचा काळ लागला त्यानंतर आतापर्यंत राज्यामध्ये नवीन 10 जिल्ह्याची भर पडून 36 जिल्ह्यांचा महाराष्ट्र झाला आहे, असं असलं तरी आत्ता पण जिल्ह्याचे शेवटच्या गावातून येणार्‍या नागरिकाला एक दिवस पूर्ण खर्च घालावा लागतो तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये जाणे-येणे होत. त्यामुळे आणखी 22 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात येत आहे सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागरिकांना पूर्ण दिवस जात असल्यामुळे नवीन जिल्हा निर्मिती करावी आणि ती करण्यासाठी प्रस्तावना देण्यात आली आहे.

महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वी खानदेश, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे दहा जिल्हे होते 01 मे 1960 ला दुभाषिक मुंबई राज्याचा विभाजन झाला आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरातचे निर्मिती झाली. New Districts List

 

 

Maharashtra New Districts List  पहिले 26 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आले त्यामध्ये ठाणे, कुलाबा (आत्ताचे रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद), नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव,भंडारा, चांदा (आत्ताचे चंद्रपूर) हे 26 जिल्हे नव्या अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.

 

ठाणे, कुलाबा (रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) असे एकूण 26 जिल्हे मिळून महाराष्ट्र राज्य तयार झाले

 

1981 पासून आत्तापर्यंत आणखी नवे दहा जिल्हे झालेत या जिल्ह्यामधून रत्नागिरीतून-सिंधुदुर्ग निर्माण झाला, छत्रपती संभाजीनगर मधून जालना, धाराशिव मधून लातूर, चंद्रपूर मधून गडचिरोली, बृहन्मुंबई मधून मुंबई उपनगर, अकोला मधून वाशिम, धुळे मधून नंदुरबार, परभणी मधून हिंगोली, भंडारा मधून गोंदिया आणि ठाण्यामधून पालघर असे दहा जिल्हे निर्माण झाले.आता आणखी 22 जिल्हे (New District in Maharashtra) प्रस्तावित आहेत त्या जिल्ह्याची यादी वर दिलेल्या लिंक वरून पाहू शकता,या नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, तुमची महसुली कामे कोणत्या जिल्ह्यात येतील आणि तुमचा नवीन कोणता जिल्हा असेल हे यादीत दिलेलं आहे.New District in Maharashtra

 

22 प्रस्तावित जिल्ह्यांची यादी :-

नाशिक मधील मालेगाव, कळवण
पालघर मधलं जव्हार
अहमदनगर मधील शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
ठाण्यामधून मीरा-भाईंदर, कल्याण
पुणे मधून शिवनेरी
रायगड मधून महाड
सातारा मधून मानदेश
रत्नागिरी मधून मानगड
बीडमधून अंबाजोगाई
लातूर मधून उदगीर
नांदेड मधून किनवट
जळगाव मधून भुसावळ
बुलढाणा मधून खामगाव,अचलपूर
यवतमाळ मधून पुसद
भंडारा मधून साकोली
चंद्रपूर मधून चिमूर
गडचिरोली मधून अहिरे (असे २२ जिल्हे आहेत.)

Leave a Comment